Thursday, December 31, 2020

Thank you 2020 !

आता ३१ डिसेंबर हा दिवस माझ्यासाठी बहुदा मागे वळून पाहण्याचा, वर्तमानाचे आभार मानण्याचा आणि येत्या वर्षाचं मोकळ्या मनाने स्वागत करण्याचा दिवस झालाय. यावर्षी

२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच अत्यंत वेगळं ठरलं असलं तरी भावना कृतज्ञतेचीच आहे. कारण कुठलीच वस्तू, परिस्थिती किंवा माणूस संपूर्णपणे चांगला किंवा वाईट नाही. त्यामुळे घडून गेलेल्या, न बदलता आलेल्या, आपल्या control बाहेरच्या गोष्टींना आठवण्यापेक्षा त्यांनीही जाता जाता आपल्याला काय शिकवलं, हे बघायला काय हरकत आहे ?!

इतकं 'जागतिक सामायिक' वर्ष मी पहिल्यांदाच अनुभवलं आहे. अनिश्चिततेची निश्चितता स्विकारुन माणसाने स्वतःला कसं संयत ठेवावं, हे सांगणारं वर्ष ठरलं. माणसाला परिस्थितीशी जुळवून घेण्याची किती मोठी ताकद निसर्गाने दिलीये ! मग आपण कुरकुर कशाची आणि का करावी ? मान्य आहे, भरल्या पोटी हे बोलणं, लिहिणं फार सोपं आहे. ज्यांच्या पोटाला चिमटा बसला, ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं आहे. पण स्वतःला कुठल्याही बाबतीत 'privileged' असल्याची जाणीव झाल्यानंतर कितीतरी जणांनी आपापल्या विचारांप्रमाणे, कुवतीप्रमाणे, संधी मिळेल तिथे, तेव्हा मदत केल्याची संख्याही कमी नाही आणि ज्यांनी स्वतःला याबाबतीत procrastinate केलंय, त्यांनाही देरी किस बात की ?!

आणखी एक गोष्ट, तुमच्यापैकी आणखी कोणाला असं वाटलं का या वर्षात की अरे, आपण निसर्गाची काळजी घेणार नाही, आपणच इतर माणसांची काळजी घेणार नाही, तर कोण आहे या जगात दुसरं आपली काळजी घ्यायला ? म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत जशी काळजी करतो ना, तसं काहीसं feeling आलं या जगातल्या सगळ्या माणसांसाठी irrespective of all man-made boundries. MJ जसं म्हणतो, Make it better place, for you and for me and the entire human race! तसं काहीसं. तुम्हांला नाही वाटत आपल्याला; म्हणजे एकूणच माणसाला; एकमेकांशी अजून चांगलं वागायला खूप scope आहे ? हा माझा optimistic approach असावा, patience असावा किंवा pipedream असावं पण उम्मीद पे दुनिया कायम है !

माणूस हा evolving प्राणी आहे आणि सुख-दुःख काहीच permanent नाही. मग आहे ती परिस्थिती स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी अनुcool करून घेण्यावर concentrate करायला काय हरकत आहे ?! स्वतःचं स्वतःला entertain कसं करता येईल, हा विचार करायला आणि प्रत्यक्षात आणायला सुद्धा आपल्याला भरपूर वेळ दिलाय या वर्षाने. Remember all those peaceful moments which allowed us to introspect. Those are precious!

आयुष्य सुंदर आहे पण आपलं आयुष्य सुंदर करण्याची जबाबदारी आपली आहे. Phases, माणसं, वस्तू यांचा additions आणि deletions चा चढ-उतार चालायचाच! त्या त्या वेळेला ते ते स्वीकारून पुढे जात राहण्यात मजा आहे. Let go करण्यात सुकून आहे. प्रत्येक दिवस काही ना काही शिकवणारा आहे. पण ती शिकवण लक्षात घ्यायची जबाबदारी आपली आहे. तेव्हा २०२० च्या ३६६ दिवसांचे मन:पूर्वक आभार.
जाता जाता 'La La Land' या अत्यंत सुंदर सिनेमातलं एक वाक्य आठवलं. Keith - Sebastian ला म्हणते, "How are you going to be a revolutionary if you’re such a traditionalist? You’re holding onto the past, but jazz is about the future." :)

सर्वांना येत्या २०२१ वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! येतं वर्ष आनंदी आणि निरामय जावो!

Wishing you all a very happy and healthy new year!

- भक्ती
३१.१२.२०२०



Monday, July 6, 2020

इतर : गुरु

छायाचित्र सौजन्य : www.tinybuddha.com

    'गुरुपौर्णिमे'च्या दिवशी आपले किती गुरु आहेत आणि किती म्हणून आयुष्यात शिकायचं बाकी आहे हे जरा अधिकच प्रकर्षाने मनात अधोरेखित होतं. 'ज्ञानापुढे' आपण खूप लहान असल्याचं जाणवतं. आज सहजच 'गुरु' ही संकल्पना माझ्या मनात कशी घडत गेली याविषयी थोडा विचार केला. त्याविषयी...
.
सुविचार १ : 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो'
शाळेत फळ्यावर सगळ्यात वरती सुवाच्च्य अक्षरात रंगीत खडूने रोज एक नवीन सुविचार लिहिलेला असायचा. आता विचार करताना आठवतंय की अक्षर सुवाच्च्य असो किंवा नसो, हे सुविचार नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचे. पण तो सुविचार वाचायचा आणि स्वतःच्या मनाला समजवायचं की 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हं !' यापुढे काही त्या शालेय जीवनातल्या विचारांची उडी जायची नाही. आता वयाचं तिसरं दशक almost संपत आलेलं असताना, आपलं कुटुंब, आपले मित्र-मैत्रिणी, आपले छंद, आपलं शहर, देश यांच्या परे कवेत मावणार नाही इतकं ज्ञान आजमवायचं राहिलंय अजून हे प्रत्येक गाणं ऐकताना, पुस्तक वाचताना, फिल्म पाहताना, नवनव्या लोकांना, जागांना भेटी देताना लक्षात येतं, तेव्हा पटतं की ही 'विद्यार्थीदशा' never ending आहे आणि ती आनंददायक आहे !
.
सुविचार २ : Reading between the lines is very important!
पुन्हा एकदा शाळेचा reference देते. अगदी पहिली ते तिसरीचा. तीन विषय असायचे - भाषा, गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञानापुढे मी कायमच आदरपूर्वक शरणागती पत्करली आहे ती आजतागायत. त्यामुळे मी त्यांना 'buddies' zone मध्ये कधी येऊच दिलं नाही आणि 'भाषा' मात्र पहिल्यापासूनच bff ! त्यातही नुसते धडे वाचून नाही, पण त्या धड्यांवर कधीतरी माझी मैत्रिणींशी किंवा स्वतःशी नकळत चर्चा झाली की धडा खऱ्या अर्थाने 'शिकल्याचं' समाधान मिळायचं ! तेव्हा चर्चेसाठी conscious efforts घेता येऊ शकतात हे मला कळलं असल्याचं स्मरत नाही ! Organically घडतील तेवढ्याच चर्चा व्हायच्या ! 'वाचणं' - 'शिकणं' आणि 'शिक्षक' - 'गुरु' यात फरक आहे हे नंतर उमगलेलं ज्ञान !
.
सुविचार ३ : प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं !
हळुहळू कळत गेलं की शिकण्यासाठी प्रत्यक्ष गुरु समोर असायला हवा असं नाही. समोर असण्यासाठी प्रत्येक गुरु मूर्त रूपात असेलच असंही नाही. प्रत्येक गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठाच असेल असंही नाही. त्या व्यक्तीला/गोष्टीला आपण त्याला/तिला गुरु मानलंय हे माहिती असेल असंही नाही आणि अमुक एका व्यक्तीकडून/गोष्टीतून/घटनेतून/परिस्थितीतून आपण काहीतरी शिकल्याचं आपल्या प्रत्येक वेळी लक्षात येईल असंही नाही. या सगळ्या माझ्या 'गुरु'विषयी संकल्पनांतून 'Heal the world' म्हणणारा Micheal Jackson ही माझा गुरु होतो. संगीताविषयी सहजतेने बोलणारे अजय चक्रवर्तीही माझे गुरु होतात. एखादं विचार करायला लावणारं आणि त्यातून एखादा विचार मनात रुजवून जाणारं पेंटिंगसुद्धा गुरुस्थानी असू शकतं. निर्व्याज गोष्टी आपल्याला देणारा 'निसर्ग' तर all-time favourite गुरु आहेच आणि इतकंच कशाला, जिथे धड बसायला बाकही नाहीत, अशा शाळेत जेव्हा मी भेट द्यायला जाते, तेव्हा एखादं तिसरी-चौथीतलं मूलही एखादं असं वाक्य बोलून जातं की त्या निरागसतेतूनही बरंच काही शिकता येतं !
.
सुविचार ४ : अहं ब्रह्माsस्मि।
बऱ्याच लोकांना वाटतं की हे वाक्य हे over confidence चं लक्षण आहे किंवा 'स्वतःला काय समजते / समजतो' ही त्यावरची default रिऍक्शन असू शकते किंवा काही लोक त्याला हिंदुत्ववादाचा किंवा धार्मिक touch वगैरे सुद्धा देऊ शकतात किंवा मग स्वतःला किती संस्कृत येतं हे दाखवायचंय, असा एक उथळ विचार सुद्धा यामागे असू शकतो. असो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना l माझ्यासाठी हे वाक्य self-confidence देणारं वाक्य आहे.
रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना संस्कृत विषय होता अभ्यासाला पाचही वर्ष. त्यातल्या कुठल्या वर्षी या वाक्याशी ओळख झाली ते नेमकं आठवत नाही. पण ओळख झाल्यापासून या वाक्याने हाच आशय माझ्यापुढे कायम अधोरेखित केला. शब्दश: बघायला गेलं तर या वाक्याचा अर्थ होतो, 'मी ब्रह्म आहे'. आता यापैकी 'ब्रह्म' हा शब्द ते वर सगळे म्हटलं ते अर्थ उपस्थित करतो. पण मला असं वाटतं 'ब्रह्म' म्हणजे 'जग' किंवा 'आयुष्य'. प्रत्येकाचं ब्रह्म वेगळं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि जगाचा कर्ता पण वेगळा. ती व्यक्ती स्वतः. आपण बाहेरच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी खूपदा बघतो. पण आपल्या आतल्या space ला तितका वेळ देत नाही, महत्त्व देत नाही. आपल्याकडची बुद्धी, विचारशक्ती, समज वेगवेगळ्या प्रमाणात माणसाला मिळालेली असते. पण इतक्या वर्षांच्या काळात बाहेरून आलेली माहिती आपण आपल्या आत प्रयत्नपूर्वक process करतो, cultivate करतो. त्यामुळे या आपल्या आत असलेल्या शक्तीला-जाणिवेलासुद्धा आजच्या दिवशी योग्य ते महत्त्व दिलं गेलं पाहिजे, तिचं योग्य तितकं कौतुक केलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं.
.
    बाह्यजगातून अंतरंगात ज्ञान पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाला आणि जाणिवेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार.

Wednesday, June 3, 2020

इतर : Sorry!


    कोरोना, चक्रीवादळ हे सगळं वाईट चाललंय, अस्वस्थ करतंय. पण आज जास्त अस्वस्थ केलं आहे ते केरळच्या हत्तीणीच्या बातमीने. कारण कोरोना, चक्रीवादळ ही सगळी कुठे ना कुठे आपल्या कर्माची मिळालेली फळं आहेत. पण त्या बिचाऱ्या हत्तीणीचा आणि पूर्ण वाढही न झालेल्या त्या पिल्लाचा काय दोष होता ? भारतात सगळ्यात जास्त 'literacy rate' असलेल्या राज्यात झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की शिक्षित लोकांच्या मनावर माणुसकीचा शिडकावा झालेला असेलच याची खात्री नाही. भारतीय संस्कृतीत गणपतीचं स्थान फार मानाचं आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी याहून दुर्दैव ते काय ? कितीही अंगारे-धुपारे करा, नवस बोला, मंत्रोच्चार करा, अभिषेक करा, सोन्याने मढवा देवांना. काय उपयोग मनातल्या दगडाला माणुसकीचा पाझर फुटत नसेल तर ?? माणसाची लायकी नाही राहिली माणूस म्हणवून घ्यायची. माणूस कसा इतका भावनाशून्य होऊ शकतो ? मला नेहमीच वाटत आलंय की माणसाला थोडी बुद्धी जास्त मिळालीये. फुलं, झाडं, पानं, पक्षी, कीटक, प्राणी यांना आपण खूप ग्रांटेड घेतो. कुठलंही पान, फुल, झाड मनात येईल तेव्हा तोडतो, त्यांचे फोटो काढतो. पक्षी, कीटक, प्राणी यांना मारतो. पशु-पक्ष्यांना आपला 'शौक' म्हणून, चार इतर दगडी मनांच्या लोकांमध्ये 'awww आमचं मन कसं sensitive आहे' असा बढेजाव मिरवण्यासाठी आपल्या चॉईसप्रमाणे त्यांच्या जन्मदात्यांपासून वेगळं करतो. का ? केवळ त्यांच्या इतक्या नाजूक भावना ते आपल्यासारखं शब्दांद्वारे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ? असा विचार करून माणूस जर एखाद्या प्राण्यावर कुठल्याही पद्धतीने अधिकार गाजवत असेल तर त्या माणसांनी लक्षात घ्यावं कि हे प्राणी स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत नाहीयेत तर आपण अपयशी ठरलोय. कारण त्यांच्या निःशब्द भावना समजून समजून घेण्याइतका आपला so called 'emotional quotient' develop झालेला नाही. इतक्या जीवघेण्या त्रासातून जात असताना जेव्हा एक गरोदर हत्तीण कोणाही मानवरूपी पशूचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता, ३ दिवस कळा सोसून नदीत जाऊन आपला प्राणत्याग करायचं ठरवते, तेव्हा ती जिंकलेली असते, माणूस नाही. ही बातमी वाचून जर आपण अस्वस्थ झालो नसू, तर आपण मेलोय असं जाहीर करायला हरकत नाहीये. Sorry! तुझी आणि तुझ्या बाळाची मनापासून माफी मागते.

सिनेमा : Parasite (2019) - The South Korean Film

Parasite (2019) : A film by Bong Joon Ho

    सध्या आपण घरांमध्ये अडकून राहिलो असलो तरी वेगवेगळ्या जगात डोकावून पाहिलं जातंय ते फिल्म्सद्वारे. फिल्मच्या शेवटी हाती फक्त झगमगाट आणि चार सुंदर मुलं आणि मुली पाहून झाले हा विचार देणाऱ्या फिल्म्सपासून ते एखादा विचार नकळतपणे मनावर कोरून जाणाऱ्या फिल्म्सपर्यंत किंवा 'The Blue Umbrella' सारख्या लहान मुलांच्या फिल्मपासून गुप्तहेर खात्याच्या रंजक कथा समोर आणणाऱ्या फिल्म्सपर्यंत सगळं पाहत्ये सध्या. परवा कुठली फिल्म पाहूया म्हणून surfing करत होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या कंफर्ट झोनच्या बाहेर जाता येतंय का बघूया म्हटलं आणि 'Parasite' ही ब्लॅक कॉमेडी थ्रिलर फिल्म बघायचं ठरवलं. गेल्यावर्षी Cannes Film Festival मध्ये या फिल्मचा प्रीमियर झाला आणि ही या फेस्टिवलमधली पहिली साऊथ कोरियन अवॉर्ड विनिंग फिल्म ठरली. कोरियन भाषा ही अगदीच वेगळी असल्याने इंग्लिश सबटायटल्सचा आधार घेण्यावाचून पर्याय नव्हता. सिनेमाचं कथानक तसं खूप छोटं आणि साधं आहे. पण फिल्म पूर्ण झाल्यानंतर मनात आलेला पहिला विचार हा होता की सगळीकडची माणसं सारखीच असतात. हातात 'सत्ता' असण्याचं माणसाला प्रचंड आकर्षण आहे. कुणासाठी 'सत्ता' हा शब्द फक्त आर्थिक गणितांपुरता मर्यादित असतो तर कुणाला एखाद्या गोष्टीवर, ठिकाणावर, माणसांवर आपलं वर्चस्व निर्माण करून सत्ताधारी असल्याचा आनंद मिळतो.या सिनेमात सब-वे खाली राहणाऱ्या एका गरीब चौकोनी कुटुंबाची गोष्ट आहे. योगायोगाने या कुटुंबातल्या मुलाला एका श्रीमंत घरातल्या तरुण मुलीला इंग्रजी शिकवायची संधी मिळते. त्यानंतर एक-एक करत या गरीब कुटुंबातली चारही माणसं या श्रीमंत कुटुंबात वेगवेगळ्या कामांद्वारे प्रवेश मिळवतात आणि मग पुढे ही फिल्म अतिशय अनपेक्षित वळण घेते. 'मर्यादेयं विराजते' किंवा 'अति तिथे माती' अशा म्हणी फक्त आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या नसून त्या मानवी विचारांच्या आणि परिस्थितीच्या घर्षणातून जन्माला येऊन त्या त्या संस्कृतीचा वेश परिधान करून जगभर वावरत आहेत, असं वाटतं आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात इच्छेची जागा हावेने घेतली कि त्याचा अंत हा विनाशकारीच होतो हे पटतं. असे चांगले सिनेमे घरात राहूनसुद्धा आपल्या मनातल्या बंद असलेल्या विचारांच्या खिडक्यांवर ठोठावतात आणि आपलाच आपल्याशी संवाद सुरु करतात. जागरूक करतात. प्रगल्भ करतात.. आणि हे सगळं होतं कारण Lockdown बाहेर आहे, आत नाही !

Friday, May 15, 2020

Lockdown v/s Quarantine 2020

    'Lockdown' ही निरोगी माणसांनी रोग झालेल्या माणसांच्या संपर्कात येऊ नये म्हणून तयार केलेली परिस्थिती आहे आणि 'Quarantine' म्हणजे एखादा रोग 'झालेल्या' माणसाला इतर निरोगी लोकांपासून वेगळं ठेवणे.
    
    फरक आहे अर्थाच्या शेडमध्ये. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी आपापल्या घरी वेळ घालवण्यासाठी निवडलेले मार्ग जगाला दाखवत असताना सर्रास #quarantinediaries वगैरे हॅशटॅग वापरणं is not cool ! Slowdown होऊया. जवाबदरीने वागूया. थोडं अधिक sensitive होऊया आपल्या कृतींबाबतीत. सगळ्याच बाबतीत. हीच ती वेळ आहे आणि आपल्यात ठरवून काही चांगले बदल करण्यासाठी सध्या वेळही आहे.
    
    Lockdown च्या काळात आपण केलेली प्रत्येक गोष्ट जगाला दाखवता आलीच पाहिजे आणि दाखवलीच पाहिजे असं नाहीये! या अशा काही फोटो टाकून दाखवता न येणाऱ्या गोष्टी जगात व्हायची गरज जास्त आहे येणाऱ्या पुढच्या काळात !

Thursday, April 30, 2020

सिनेमा : Irrfan



Films पाहण्या आणि त्यातून शिकण्याव्यतिरिक्त bollywood हे मला माझ्या आयुष्यापासून खूप लांब असल्यासारखं वाटतं. I don't remember when I last cried for any bollywood actor or actress. Not that I was heartless or disrespectful. Somehow didn't feel the connect. But today I am disturbed since morning. I cried. Felt grateful for what he has given us. Felt hearbroken for not being able to watch his films in the future.
I didn't realize when I started admiring him unknowingly and when I developed so much respect towards him. How I am posting something like this ?! I am surprised myself. But I think this is the power real actor possesses.
An actor whose art left us spellbound not only while watching his movies but also when he left us for the heavenly abode.
Huge loss of Indian Cinema.
Respect Mr. Irrfan Khan.
May your soul rest in peace.

Friday, April 17, 2020

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 6



काश! 'निसर्ग' ही कोणी एक व्यक्ती असती आणि आपल्याला त्याला follow करता आलं असतं...सोशल मीडियावर. 'Nature_official'....simply wow !

या quarantine period मध्ये केवढं active असतं निसर्गाचं account!
केवढे followers वाढवता आले असते त्याला!
आणि Live गेला असता तर मग संपलंच! वेबसाईट crash च झाली असती बहुतेक !
सतत content creation! जलवा!
पण याला ना कळतंच नाही. स्वतःचा उदोउदो करून घेणं त्याच्या मनातसुद्धा येत नाही!
की याने स्वतःचं talent discover च केलं नाहीये ? Social Influencer आहे अरे हा!! कोणीतरी सांगा याला !
अरे हा किती मागे पडतोय जगाच्या !!??
आपण सगळे आहोत आजुबाजूला. तरी fomo याला शिवतसुद्धा नाही !
किती तो स्थितप्रज्ञ !
आपापलं काम करत असतो उसन्या प्रसिद्धीच्या मार्गी न जाता !
उलट त्याच्याकडे जे काही आहे, ते सढळ हस्ते देत सुटलाय जगाला...without any professional charges!
त्याच्या साधेपणात किती सौंदर्य आहे!
अं...म्हणूनच कदाचित followers वाढवण्यासाठी त्याला agency appoint करावी लागली नसावी. किती contentful yet नि:स्वार्थी !
किती निरपेक्ष आणि सुंदर !
काश! 'निसर्ग' ही कोणी एक व्यक्ती असती आणि आपल्याला त्याला follow करता आलं असतं...खऱ्याखुऱ्या आयुष्यात!

Thursday, April 9, 2020

'उदर'भरण नोहे...

    सध्या लोकांकडे बराच वेळ आहे. त्यामुळे कित्येक लोक स्वयंपाकाशी संबंधित आपल्या सगळ्या हौशीमौजी भागवण्यात गुंतले आहेत. कोणी काही नवीन पदार्थ शिकतंय, तर कोणी ज्यावर हात बसलाय असे पदार्थ आपल्या घरच्यांना करून खाऊ घालतंय. एकंदरीतच काय तर सध्या सोशल मिडियावरच्या पोस्ट आणि स्टोरीज चमचमीत पदार्थांपासून ते dalgona coffee पर्यंत सगळ्या पदार्थांनी भरलेल्या आहेत.

    मित्रांनो, मला लोकांच्या उत्साहाचा पूर्ण आदर आहे. खरं पाहता प्रत्येक जण आपापल्या घरी स्वकष्टांनी सगळं करून खातोय. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार नाही. पण सद्य परिस्थितीत आपण सगळे एकत्र आहोत असं आपण सारखं ऐकतो, वाचतो आणि मानतोही. त्यामुळे याच आपुलकीच्या अधिकाराने एक विचार मनात आला तो शेअर करते.


    मित्रांनो, आपल्याला जी सक्तीची सुट्टी मिळालीये ती मजा करण्यासाठी नव्हे. आपल्या हौसेचा पूर्ण आदर राखत एक विनंती करावीशी वाटते, की सध्या जिभेची ईच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपण कमीत कमी अन्नघटकांमध्ये पोटाची भूक भागवली जाईल, असे पदार्थ करण्याकडे भर देऊया. साग्रसंगीत पिझ्झा, पास्ता, पावभाजी किंवा तत्सम इतर कुठलेही चमचमीत पदार्थ ही आपली सध्याची गरज नसावी. त्यापेक्षा आमटी, पिठलं, भात, खिचडी, पुलाव, पोळ्या, भाकऱ्या, साध्या भाज्या अशा पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे.इतर वेळी अर्धा लिटर दुधामध्ये सगळ्यांचा दोन वेळचा चहा होत असेल तर केवळ पोस्ट टाकण्यासाठी एकाच वेळी अर्धा लिटर दूध संपावणाऱ्या dalgona coffee चा अट्टाहास सध्या नको. कारण जितके जास्त पदार्थ आपण एका वेळी वापरू, तितके लवकर घरातले पदार्थ संपतील आणि तितक्यांदा आपल्याला सारखं बाहेर पडावं लागेल किंवा घरी सामान मागवावं लागेल. यापैकी कुठलाही ऑप्शन हा कोरोनाचा संसर्ग वाढवण्याला हातभार लावू शकतो. इतर वेळी आपण जिभेचे आणि मनाचे लाड पुरवतोच की! त्यामुळे चंगळ थांबवून गरज भागवण्याकडे आत्ता भर दिला पाहिजे आणि घरात आहे ते सामान जास्तीत जास्त दिवस कसं पुरवता येईल याची मॅनेजमेंट आत्तापासून केली पाहिजे. बाजारातल्या गोष्टीसंपून परिस्थिती बिकट होण्याआधीच.

    काही जण म्हणतील की आमच्यासाठी cooking ही पॉझिटिव्हिटी निर्माण करणारी गोष्ट आहे किंवा passion, मेडिटेशन आहे वगैरे. अशा लोकांचाही मनापासून आदर आहे. पण सध्याच्या परिस्थितीत एखाद वेळेला exclusive पदार्थ करून तिथे थांबायचं की रोज स्वतःला कमीत कमी पदार्थांत जास्तीत जास्त चविष्ट अन्न तयार करण्याचं challenge देऊन आनंद साजरा करायचा, हे ज्याचं त्या ने ठरवावं.

    आतापर्यंतची कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता लॉकडाऊन पिरेड हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. असं किती दिवस, आठवडे, महिने सुरू राहील माहिती नाही. असं न होवो अशी मनापासून इच्छा आपण सगळेच करत असलो तरी संकट आलंच तर त्याचा सामना करायची तयारीही एकीकडे करायला हवी आणि जितकी आपली तयारी आपण दाखवू, तितकं संकट कमी होत जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सोसायटीने, नगरसेवकांनी किंवा इतर सामाजिक संस्थांनी काही गरजेच्या वस्तू आणून द्यायची सोय केली तर त्याचा गैरफायदा कोणी घेता काम नये. 'गरज' आणि 'चैन' यातला फरक लक्षात घेऊन वागुया.

    हा विचार मांडत असताना कोणावर टीका करायचा हेतू नाहीये. कारण प्रत्येक घरात केलेली अन्नाची साठवण, माणसांची संख्या आणि त्यानुसार एका वेळच्या अन्नाची लागणारी गरज ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे आपापल्या घरातल्या एकूण परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाने 'गरजेचा' मापदंड ठरवण्याची ही वेळ आहे.

    जर आपण एकीची भावना निर्माण व्हावी म्हणून खिडक्या-दारांमध्ये येऊन थाळीनाद करू शकतो आणि दिवे लावू शकतो, तर त्याच एकीच्या भावनेने आपापल्या स्वयंपाकघरात रोजच्या जेवणाची मॅनेजमेंट करून एकमेकांची मदत आणि सुरक्षा नक्कीच करू शकतो. बघा पटलं तर..

Wednesday, March 25, 2020

संगीत : Heal the world !

    
सौजन्य : Michael Jackson World Network

जगात माणसाच्या वरचढ एक शक्ती आहे, यावर माझा विश्वास आहे. पण प्रार्थना करण्यासाठी समोर कुठली एखादी मूर्ती असलीच पाहिजे ही माझी गरज नाही. मनातून वाटेल तेव्हा, वाटेल त्या ठिकाणी आणि कुठल्याही जाती-धर्मांच्या माणसासाठी प्रार्थना करून मिळणारं समाधान हे माझ्यासाठी खूप मोठं असतं.

    आठवत नाही नेमकं केव्हापासून. पण गेली कित्येक वर्षं कधीही नतमस्तक होऊन हात जोडले गेले की पहिल्यांदा माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडतात ते म्हणजे 'सगळ्यांचं भलं होवो. सर्वांना सुबुद्धी मिळो.' आज एका गोष्टीची खात्री पटलीये की माणसाने माणसासाठी जात, धर्म, रंग, देश यांच्या परे जाऊन, अतिशय निर्लेप होऊन, केवळ एक 'माणूस' म्हणून केलेली प्रार्थना हीच सर्वश्रेष्ठ आहे आणि काळाची गरज आहे.

    माणूस इतका स्वार्थी का होत गेला असा विचार करून खूप वाईट वाटतं. असं वाटतं रामराज्य नको, पण हे जग सुधारण्याची शक्ती मिळायला हवी आणि त्याही आधी प्रत्येक माणसाच्या मनात हे जग सुधारण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी, फक्त स्वतःसाठी नाही, तर सगळ्यांसाठी; तरच माणूस तसा वागेल आणि आपल्याला एकमेकांना या परिस्थितीतून बाहेर काढता येईल!

परवा मायकल जॅक्सनचं हे गाणं ऐकलं पहिल्यांदाच. अजूनही डोक्यातून जात नाहीये. He says -

There's a place in your heart
And I know that it is love
And this place could be much
Brighter than tomorrow
And if you really try
You'll find there's no need to cry
In this place you'll feel
There's no hurt or sorrow
There are ways to get there
If you care enough for the living
Make a little space
Make a better place
Heal the world
Make it a better place
For you and for me
And the entire human race
There are people dying
If you care enough for the living
Make it a better place
For you and for me
If you want to know why
There's love that cannot lie
Love is strong
It only cares of joyful giving
If we try we shall see
In this bliss we cannot feel
Fear of dread
We stop existing and start living
The it feels that always
Love's enough for us growing
So make a better world
Make a better place
Heal the world
Make it a better place
For you and for me
And the entire human race
There are people dying
If you care enough for the living
Make a better place for you and for me
And the dream we were conceived in
Will reveal a joyful face
And the world we once believed in
Will shine again in grace
Then why do we keep strangling life
Wound this earth, crucify its soul
Though it's plain to see
This world is heavenly
Be god's glow
We could fly so high
Let our spirits never die
In my heart I feel you are all my brothers
Create a world with no fear
Together we cry happy tears
See the nations turn their swords into plowshares
We could really get there
If you cared enough for the living
Make a little space
To make a better place
Heal the world
Make it a better place
For you and for me
And the entire human race
There are people dying
If you care enough for the living
Make a better place for you and for me
There are people dying
If you care enough for the living
Make a better place for you and for me
You and for me

Wednesday, March 18, 2020

#कोरोना२०२०


    मला टिव्ही बघायची शून्य आवड. बरीच वर्षं झाली टिव्ही रोजच्या जगण्यातून काढून टाकून. त्यामुळे भयंकर सिरियल्स, भयंकर बातम्या, भयंकर जाहिराती यांच्यापासून बराच काळ माझा बचाव मी करून घेत आले आहे. पण सध्या या कोरोना प्रकारामुळे आज बराच वेळ बातम्या बघितल्या गेल्या आणि खरोखर मला भीती वाटली की अजून थोडा वेळ मी हे असंच सुरू ठेवलं, तर नैराश्य येईल की काय! बातम्या बंद केल्या आणि गाणी ऐकायला लागले.
मित्रांनो, आत्ता मला यात दोष कोणाचा या मुद्द्यात अजिबात पडायचं नाहीये. कारण परिस्थिती इतक्या हातघाईवर आलीये की दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा आपल्यात बदल करणं सोपं आहे आणि ते जास्त लवकर केले जाऊ शकतायत, असं वाटलं म्हणून हे लिहिते आहे.
आजुबाजूच्या परिस्थितीला underestimate करून चालणार नाहीये किंवा आपण टिव्ही बघितला किंवा नाही बघितला म्हणून परिस्थितीसुद्धा बदलणार नाहीये. पण शारीरिक आरोग्याची काळजी घेत असताना आपलं मानसिक आरोग्य बिघडत नाहीये ना हे आपलं आपण तपासत रहायला हवंय. कितीतरी लोक कोरोनाचा संसर्ग झालाय असं वाटून किंवा त्या भीतीने स्वतःला काहीतरी करून घेतायत. बरेचसे लोक खूप घाबरले आहेत. प्लिज, आपल्या माणसांना आपण समजावूया की भीती वाटणं चुकीचं नाही किंवा त्यात लाज वाटण्यासारखंही काही नाही. Whatsapp, Instagram, facebook, TV वर फिरणारे मेसेज, फोटो, बातम्या या सगळ्यांच्या पचनी पडतीलच असं नाही. प्रत्येकाची मानसिक स्थिती आणि शक्ती वेगळी आहे. पुढे काय होणार आहे माहिती नाही. पण या सगळ्यातून जात असताना एक समाज आणि एक माणूस म्हणून एकमेकांची सर्वतोपरी काळजी घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या एकूण परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाहीये. सगळ्या प्रसारमाध्यमांपासून थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. आपल्या आवडीची गोष्ट करा, घरातल्या माणसांशी 'कोरोना' हा विषय सोडून इतर काहीही बोला, सकारात्मक पुस्तकं वाचा, इ. केल्याने टेन्शन, भीती थोडी कमी होईल. गरज वाटलीच तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्या.
आज सगळ्या सीमांपालिकडे जाऊन फक्त एक माणूस म्हणून एकमेकांना मदत करायची गरज आहे.
Be positive! Let's hope for the best! Cheers!

Friday, February 28, 2020

मराठी भाषा दिन २०२०



    'निमित्तां'चं महत्व आयुष्यात फार आहे. म्हणजे जगात एका वेळी कोट्यावधी गोष्टी घडत असतात. कुठल्यातरी निमित्तामुळे आपलं लक्ष एखाद्या मुद्द्याकडे किंवा गोष्टीकडे वेधलं जातं. त्याहीपलीकडे जाऊन असं म्हणावसं वाटतं की त्या गोष्टी २४ x ७ x ३६५ आपल्या आयुष्याचा भाग असल्या तरी एखाद्या निमित्ताने त्यांचं अस्तित्व अधोरेखित केलं जातं. पण एक गंमत आहे. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे बहुतेकदा निमित्ताने एखाद्या गोष्टीची आठवण करून दिली तरी आपण त्या गोष्टीच्या चांगल्या बाजूकडे लक्ष देतो आणि तिथेच थांबतो. पण मला असं वाटतं की सतत उलथापालथ होत असलेल्या या महाकाय जगात कुठल्या तरी निमित्ताने एखाद्या बारीकशा गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं गेलंच आहे, तर उत्सव करून झाला की त्या गोष्टींचा सर्वांकष विचारही करावा. प्रगतीसाठी. तसंच आज केलंय थोडं स्वपरीक्षण...मराठी भाषेबद्दल. गेल्या वर्षी मराठी भाषेला पत्र लिहिलं होतं छोटंसं. पण या मागच्या वर्षभरात त्या मानाने लिखाण तसं थोडं कमी झालं. अलीकडेच एक दिवस अचानक लक्षात आलं की त्या दरम्यान वाचत असलेलं पुस्तक, पाहत असलेली वेबसिरीज आणि त्या क्षणी ऐकत असलेलं गाणं हे सगळं इंग्रजी होतं. शिवाय दिवसभरात कामाच्या निमित्ताने बोललं जाणारं इंग्रजी वेगळंच. इंग्रजी बरोबर शिवाय आजुबाजूला हिंदी, गुजराती आणि मराठी या भाषाही बोलल्या जातात. त्यामुळे सध्या भाषांची सरमिसळ बऱ्यापैकी होत्ये, किमान बोलताना तरी एक मराठी भाषाप्रेमी म्हणून थोडी काळजी वाटावी इतकी नक्कीच ! कुठल्या एका विशिष्ट भाषेबद्दल आकस अजिबात नाही. प्रत्येक भाषा ही स्वतंत्र आहे आणि प्रत्येकीचं, प्रत्येकासाठी महत्व वेगळं आहे. फक्त या दिवसाच्या निमित्ताने ज्यांना कुणाला अशी थोडीशी काळजी वाटत्ये आपलीच, त्यांनी स्वतःला थोडीशी आठवण करून देऊया प्रयत्नपूर्वक आपल्या प्रमाण मराठी भाषेची जपणूक करण्याची. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

Saturday, February 15, 2020

A gentle reminder!

Happy Valentine's Day, Bhakti !!!

    कालच मनात एक विचार येऊन गेला, की माणसं आपल्याला आणि आपण माणसांना कुठल्या फेज मधे भेटतो यावर कुणाही; अगदी कुणाही दोन व्यक्तींमधलं equation किती अवलंबून आहे ना ! त्यात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, बदलणाऱ्या गोष्टी या कुणाही दोन व्यक्तींमधल्या नात्याला खूप वेगवेगळे आकार आयुष्यभर; म्हणजे त्या नात्याचं जितकं काही आयुष्य असेल; त्या काळात सतत वेगवेगळे आकार देत असतात. काही नात्यांची वीण घट्ट होते, काहींची सैल होते, काही नाती तोंडदेखली उरतात, काही विरून जातात. पण एक नातं आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. आता 'आयुष्यभर' म्हणजे खरंच, जितकं आपलं आयुष्य आहे, तितकं. ते म्हणजे स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं. पण आपण जितकं दुसऱ्यावर निःस्वार्थी, मनमोकळं प्रेम करतो, तितकं स्वतःवर करतो ? जितका दुसऱ्याच्या बारीक सवयींचा आढावा घेतो, तितकं स्वतःच्या बदलत आलेल्या सवयी, आवडी-निवडींकडे लक्ष देतो ? जितकं सहज बरोबरच्या व्यक्तीला माफ करतो, तितकं स्वतःला करतो ? जितकं दुसऱ्याचं आपल्यावरचं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तितकं आपलं स्वतःवरचं प्रेम वाढावं यासाठी वेळ काढतो ?

    स्वतःवर प्रेम असणं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठीही फार महत्वाचं आहे. आपणही कधीतरी emotionally दमू शकतो, चुकू शकतो, नेमकं काय वाटतंय, कशाचं रडू येतंय, कशामुळे negative फिलिंग आलंय हे कळेनासं झालंय असं होऊ शकतं, insecurity वाटू शकते, भीती वाटू शकते. आपण आपल्याबरोबरच्या कुठल्याही व्यक्तीला जेव्हा हे सगळं वाटतं, तेव्हा it's ok असं सहज म्हणून जातो, तीच सहजता आपल्याही हक्काची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे, मी कायमच बरोबर असं मत असण्याचा फाजील आत्मकेंद्रीपणा अजिबात नाही, पण स्वतःशी थोडं अधिक चांगलं वागायला काय हरकत आहे?! आधी स्वतःला आपलं म्हटल्याशिवाय दुसऱ्याला आपलंस कसं करता यावं ?! Let's remind ourselves to love ourselves as well on this beautiful day!


Wednesday, January 1, 2020

Thank you 2019 !

    कुठलंही वर्ष संपत आलं की त्या वर्षाला थँक्यू म्हणून संपेपर्यंत एकीकडे नवीन वर्षाकडून आपल्या असलेल्या मागण्यांची यादी वाढायला मनात सुरुवात झालेली असते. पण हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे वेळ घेऊन या वर्षाला थँक्यू म्हणणार आहे.

    सगळेच अनुभव काही ना काही शिकवून जातात. एखाद्या अनुभवावर 'बरा' किंवा 'वाईट' हा मारलेला शिक्का हा एखाद्या तळ्याकडे आपण लांबून पाहणं आणि त्याच्या जवळ जाऊन तळाशी काय सापडतंय हे पाहणं यातला जो फरक आहे, तसा काहीसा आहे. २०१९ ने मला काय दिलं असा विचार करताना कुठून सुरवात करू असं होतंय. कारण या वर्षाने माझी मला एक नवी ओळख करून दिली. या वर्षाने मला संयम शिकवला. चांगुलपणा आणि भोळेपणा यात फरक आहे, हे समजावून दिलं. प्रसंगी राग व्यक्त करणं गरजेचं असतं हे शिकवलं. खूप महत्वाचं म्हणजे 'नाही' म्हणायला शिकवलं. जास्तीत जास्त स्वावलंबी व्हायला शिकवलं. आपल्या जवळच्या माणसांची नव्याने ओळख करून दिली. त्यांचं महत्व जाणवून दिलं. आयुष्य लहान आहे! ते शक्य तितकं भरभरून जगून घ्यावं, या पुस्तकी वाक्याची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. मला धीट केलं. स्वतःच्या मतांबद्दल ठाम रहायला शिकवलं. 'लोक काय म्हणतील' हा विचार किती दुय्यम आहे, याची जाणीव करून दिली आणि लोक 'त्यांच्या मतांप्रमाणे' काही ना काही म्हणतच राहतील, याची खात्री करून दिली. अतिशय महत्वाचं म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिकवलं. स्वतःचं महत्व जाणून घ्यायला शिकवलं. स्वतःवर, स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवायला शिकवलं आणि योग्य त्या वेळी स्वतःला शाबासकी द्यायलाही शिकवलं.

    दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नाही आणि आदर्शतेची आस नाही, आयुष्यभराचं ज्ञान मिळवून झालं, असा दावा तर अजिबातच नाही. पण माझ्या नजरेत माझ्या लेखी माझी जी काही थोडीशी 'सेल्फ ग्रोथ' झाली, ती घडवण्यास हातभार लावणाऱ्या अनुभवांना आणि माझ्या आप्तेष्टांना मन:पूर्वक धन्यवाद !
२०१९, आजन्म तुझ्या ऋणांत,
- भक्ती