Monday, July 6, 2020

इतर : गुरु

छायाचित्र सौजन्य : www.tinybuddha.com

    'गुरुपौर्णिमे'च्या दिवशी आपले किती गुरु आहेत आणि किती म्हणून आयुष्यात शिकायचं बाकी आहे हे जरा अधिकच प्रकर्षाने मनात अधोरेखित होतं. 'ज्ञानापुढे' आपण खूप लहान असल्याचं जाणवतं. आज सहजच 'गुरु' ही संकल्पना माझ्या मनात कशी घडत गेली याविषयी थोडा विचार केला. त्याविषयी...
.
सुविचार १ : 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो'
शाळेत फळ्यावर सगळ्यात वरती सुवाच्च्य अक्षरात रंगीत खडूने रोज एक नवीन सुविचार लिहिलेला असायचा. आता विचार करताना आठवतंय की अक्षर सुवाच्च्य असो किंवा नसो, हे सुविचार नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचे. पण तो सुविचार वाचायचा आणि स्वतःच्या मनाला समजवायचं की 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हं !' यापुढे काही त्या शालेय जीवनातल्या विचारांची उडी जायची नाही. आता वयाचं तिसरं दशक almost संपत आलेलं असताना, आपलं कुटुंब, आपले मित्र-मैत्रिणी, आपले छंद, आपलं शहर, देश यांच्या परे कवेत मावणार नाही इतकं ज्ञान आजमवायचं राहिलंय अजून हे प्रत्येक गाणं ऐकताना, पुस्तक वाचताना, फिल्म पाहताना, नवनव्या लोकांना, जागांना भेटी देताना लक्षात येतं, तेव्हा पटतं की ही 'विद्यार्थीदशा' never ending आहे आणि ती आनंददायक आहे !
.
सुविचार २ : Reading between the lines is very important!
पुन्हा एकदा शाळेचा reference देते. अगदी पहिली ते तिसरीचा. तीन विषय असायचे - भाषा, गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञानापुढे मी कायमच आदरपूर्वक शरणागती पत्करली आहे ती आजतागायत. त्यामुळे मी त्यांना 'buddies' zone मध्ये कधी येऊच दिलं नाही आणि 'भाषा' मात्र पहिल्यापासूनच bff ! त्यातही नुसते धडे वाचून नाही, पण त्या धड्यांवर कधीतरी माझी मैत्रिणींशी किंवा स्वतःशी नकळत चर्चा झाली की धडा खऱ्या अर्थाने 'शिकल्याचं' समाधान मिळायचं ! तेव्हा चर्चेसाठी conscious efforts घेता येऊ शकतात हे मला कळलं असल्याचं स्मरत नाही ! Organically घडतील तेवढ्याच चर्चा व्हायच्या ! 'वाचणं' - 'शिकणं' आणि 'शिक्षक' - 'गुरु' यात फरक आहे हे नंतर उमगलेलं ज्ञान !
.
सुविचार ३ : प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं !
हळुहळू कळत गेलं की शिकण्यासाठी प्रत्यक्ष गुरु समोर असायला हवा असं नाही. समोर असण्यासाठी प्रत्येक गुरु मूर्त रूपात असेलच असंही नाही. प्रत्येक गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठाच असेल असंही नाही. त्या व्यक्तीला/गोष्टीला आपण त्याला/तिला गुरु मानलंय हे माहिती असेल असंही नाही आणि अमुक एका व्यक्तीकडून/गोष्टीतून/घटनेतून/परिस्थितीतून आपण काहीतरी शिकल्याचं आपल्या प्रत्येक वेळी लक्षात येईल असंही नाही. या सगळ्या माझ्या 'गुरु'विषयी संकल्पनांतून 'Heal the world' म्हणणारा Micheal Jackson ही माझा गुरु होतो. संगीताविषयी सहजतेने बोलणारे अजय चक्रवर्तीही माझे गुरु होतात. एखादं विचार करायला लावणारं आणि त्यातून एखादा विचार मनात रुजवून जाणारं पेंटिंगसुद्धा गुरुस्थानी असू शकतं. निर्व्याज गोष्टी आपल्याला देणारा 'निसर्ग' तर all-time favourite गुरु आहेच आणि इतकंच कशाला, जिथे धड बसायला बाकही नाहीत, अशा शाळेत जेव्हा मी भेट द्यायला जाते, तेव्हा एखादं तिसरी-चौथीतलं मूलही एखादं असं वाक्य बोलून जातं की त्या निरागसतेतूनही बरंच काही शिकता येतं !
.
सुविचार ४ : अहं ब्रह्माsस्मि।
बऱ्याच लोकांना वाटतं की हे वाक्य हे over confidence चं लक्षण आहे किंवा 'स्वतःला काय समजते / समजतो' ही त्यावरची default रिऍक्शन असू शकते किंवा काही लोक त्याला हिंदुत्ववादाचा किंवा धार्मिक touch वगैरे सुद्धा देऊ शकतात किंवा मग स्वतःला किती संस्कृत येतं हे दाखवायचंय, असा एक उथळ विचार सुद्धा यामागे असू शकतो. असो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना l माझ्यासाठी हे वाक्य self-confidence देणारं वाक्य आहे.
रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना संस्कृत विषय होता अभ्यासाला पाचही वर्ष. त्यातल्या कुठल्या वर्षी या वाक्याशी ओळख झाली ते नेमकं आठवत नाही. पण ओळख झाल्यापासून या वाक्याने हाच आशय माझ्यापुढे कायम अधोरेखित केला. शब्दश: बघायला गेलं तर या वाक्याचा अर्थ होतो, 'मी ब्रह्म आहे'. आता यापैकी 'ब्रह्म' हा शब्द ते वर सगळे म्हटलं ते अर्थ उपस्थित करतो. पण मला असं वाटतं 'ब्रह्म' म्हणजे 'जग' किंवा 'आयुष्य'. प्रत्येकाचं ब्रह्म वेगळं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि जगाचा कर्ता पण वेगळा. ती व्यक्ती स्वतः. आपण बाहेरच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी खूपदा बघतो. पण आपल्या आतल्या space ला तितका वेळ देत नाही, महत्त्व देत नाही. आपल्याकडची बुद्धी, विचारशक्ती, समज वेगवेगळ्या प्रमाणात माणसाला मिळालेली असते. पण इतक्या वर्षांच्या काळात बाहेरून आलेली माहिती आपण आपल्या आत प्रयत्नपूर्वक process करतो, cultivate करतो. त्यामुळे या आपल्या आत असलेल्या शक्तीला-जाणिवेलासुद्धा आजच्या दिवशी योग्य ते महत्त्व दिलं गेलं पाहिजे, तिचं योग्य तितकं कौतुक केलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं.
.
    बाह्यजगातून अंतरंगात ज्ञान पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाला आणि जाणिवेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार.

Wednesday, June 3, 2020

इतर : Sorry!


    कोरोना, चक्रीवादळ हे सगळं वाईट चाललंय, अस्वस्थ करतंय. पण आज जास्त अस्वस्थ केलं आहे ते केरळच्या हत्तीणीच्या बातमीने. कारण कोरोना, चक्रीवादळ ही सगळी कुठे ना कुठे आपल्या कर्माची मिळालेली फळं आहेत. पण त्या बिचाऱ्या हत्तीणीचा आणि पूर्ण वाढही न झालेल्या त्या पिल्लाचा काय दोष होता ? भारतात सगळ्यात जास्त 'literacy rate' असलेल्या राज्यात झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की शिक्षित लोकांच्या मनावर माणुसकीचा शिडकावा झालेला असेलच याची खात्री नाही. भारतीय संस्कृतीत गणपतीचं स्थान फार मानाचं आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी याहून दुर्दैव ते काय ? कितीही अंगारे-धुपारे करा, नवस बोला, मंत्रोच्चार करा, अभिषेक करा, सोन्याने मढवा देवांना. काय उपयोग मनातल्या दगडाला माणुसकीचा पाझर फुटत नसेल तर ?? माणसाची लायकी नाही राहिली माणूस म्हणवून घ्यायची. माणूस कसा इतका भावनाशून्य होऊ शकतो ? मला नेहमीच वाटत आलंय की माणसाला थोडी बुद्धी जास्त मिळालीये. फुलं, झाडं, पानं, पक्षी, कीटक, प्राणी यांना आपण खूप ग्रांटेड घेतो. कुठलंही पान, फुल, झाड मनात येईल तेव्हा तोडतो, त्यांचे फोटो काढतो. पक्षी, कीटक, प्राणी यांना मारतो. पशु-पक्ष्यांना आपला 'शौक' म्हणून, चार इतर दगडी मनांच्या लोकांमध्ये 'awww आमचं मन कसं sensitive आहे' असा बढेजाव मिरवण्यासाठी आपल्या चॉईसप्रमाणे त्यांच्या जन्मदात्यांपासून वेगळं करतो. का ? केवळ त्यांच्या इतक्या नाजूक भावना ते आपल्यासारखं शब्दांद्वारे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ? असा विचार करून माणूस जर एखाद्या प्राण्यावर कुठल्याही पद्धतीने अधिकार गाजवत असेल तर त्या माणसांनी लक्षात घ्यावं कि हे प्राणी स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत नाहीयेत तर आपण अपयशी ठरलोय. कारण त्यांच्या निःशब्द भावना समजून समजून घेण्याइतका आपला so called 'emotional quotient' develop झालेला नाही. इतक्या जीवघेण्या त्रासातून जात असताना जेव्हा एक गरोदर हत्तीण कोणाही मानवरूपी पशूचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता, ३ दिवस कळा सोसून नदीत जाऊन आपला प्राणत्याग करायचं ठरवते, तेव्हा ती जिंकलेली असते, माणूस नाही. ही बातमी वाचून जर आपण अस्वस्थ झालो नसू, तर आपण मेलोय असं जाहीर करायला हरकत नाहीये. Sorry! तुझी आणि तुझ्या बाळाची मनापासून माफी मागते.

सिनेमा : Parasite (2019) - The South Korean Film

Parasite (2019) : A film by Bong Joon Ho

    सध्या आपण घरांमध्ये अडकून राहिलो असलो तरी वेगवेगळ्या जगात डोकावून पाहिलं जातंय ते फिल्म्सद्वारे. फिल्मच्या शेवटी हाती फक्त झगमगाट आणि चार सुंदर मुलं आणि मुली पाहून झाले हा विचार देणाऱ्या फिल्म्सपासून ते एखादा विचार नकळतपणे मनावर कोरून जाणाऱ्या फिल्म्सपर्यंत किंवा 'The Blue Umbrella' सारख्या लहान मुलांच्या फिल्मपासून गुप्तहेर खात्याच्या रंजक कथा समोर आणणाऱ्या फिल्म्सपर्यंत सगळं पाहत्ये सध्या. परवा कुठली फिल्म पाहूया म्हणून surfing करत होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या कंफर्ट झोनच्या बाहेर जाता येतंय का बघूया म्हटलं आणि 'Parasite' ही ब्लॅक कॉमेडी थ्रिलर फिल्म बघायचं ठरवलं. गेल्यावर्षी Cannes Film Festival मध्ये या फिल्मचा प्रीमियर झाला आणि ही या फेस्टिवलमधली पहिली साऊथ कोरियन अवॉर्ड विनिंग फिल्म ठरली. कोरियन भाषा ही अगदीच वेगळी असल्याने इंग्लिश सबटायटल्सचा आधार घेण्यावाचून पर्याय नव्हता. सिनेमाचं कथानक तसं खूप छोटं आणि साधं आहे. पण फिल्म पूर्ण झाल्यानंतर मनात आलेला पहिला विचार हा होता की सगळीकडची माणसं सारखीच असतात. हातात 'सत्ता' असण्याचं माणसाला प्रचंड आकर्षण आहे. कुणासाठी 'सत्ता' हा शब्द फक्त आर्थिक गणितांपुरता मर्यादित असतो तर कुणाला एखाद्या गोष्टीवर, ठिकाणावर, माणसांवर आपलं वर्चस्व निर्माण करून सत्ताधारी असल्याचा आनंद मिळतो.या सिनेमात सब-वे खाली राहणाऱ्या एका गरीब चौकोनी कुटुंबाची गोष्ट आहे. योगायोगाने या कुटुंबातल्या मुलाला एका श्रीमंत घरातल्या तरुण मुलीला इंग्रजी शिकवायची संधी मिळते. त्यानंतर एक-एक करत या गरीब कुटुंबातली चारही माणसं या श्रीमंत कुटुंबात वेगवेगळ्या कामांद्वारे प्रवेश मिळवतात आणि मग पुढे ही फिल्म अतिशय अनपेक्षित वळण घेते. 'मर्यादेयं विराजते' किंवा 'अति तिथे माती' अशा म्हणी फक्त आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या नसून त्या मानवी विचारांच्या आणि परिस्थितीच्या घर्षणातून जन्माला येऊन त्या त्या संस्कृतीचा वेश परिधान करून जगभर वावरत आहेत, असं वाटतं आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात इच्छेची जागा हावेने घेतली कि त्याचा अंत हा विनाशकारीच होतो हे पटतं. असे चांगले सिनेमे घरात राहूनसुद्धा आपल्या मनातल्या बंद असलेल्या विचारांच्या खिडक्यांवर ठोठावतात आणि आपलाच आपल्याशी संवाद सुरु करतात. जागरूक करतात. प्रगल्भ करतात.. आणि हे सगळं होतं कारण Lockdown बाहेर आहे, आत नाही !

Friday, May 15, 2020

Lockdown v/s Quarantine 2020

    'Lockdown' ही निरोगी माणसांनी रोग झालेल्या माणसांच्या संपर्कात येऊ नये म्हणून तयार केलेली परिस्थिती आहे आणि 'Quarantine' म्हणजे एखादा रोग 'झालेल्या' माणसाला इतर निरोगी लोकांपासून वेगळं ठेवणे.
    
    फरक आहे अर्थाच्या शेडमध्ये. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी आपापल्या घरी वेळ घालवण्यासाठी निवडलेले मार्ग जगाला दाखवत असताना सर्रास #quarantinediaries वगैरे हॅशटॅग वापरणं is not cool ! Slowdown होऊया. जवाबदरीने वागूया. थोडं अधिक sensitive होऊया आपल्या कृतींबाबतीत. सगळ्याच बाबतीत. हीच ती वेळ आहे आणि आपल्यात ठरवून काही चांगले बदल करण्यासाठी सध्या वेळही आहे.
    
    Lockdown च्या काळात आपण केलेली प्रत्येक गोष्ट जगाला दाखवता आलीच पाहिजे आणि दाखवलीच पाहिजे असं नाहीये! या अशा काही फोटो टाकून दाखवता न येणाऱ्या गोष्टी जगात व्हायची गरज जास्त आहे येणाऱ्या पुढच्या काळात !

Thursday, April 30, 2020

सिनेमा : Irrfan



Films पाहण्या आणि त्यातून शिकण्याव्यतिरिक्त bollywood हे मला माझ्या आयुष्यापासून खूप लांब असल्यासारखं वाटतं. I don't remember when I last cried for any bollywood actor or actress. Not that I was heartless or disrespectful. Somehow didn't feel the connect. But today I am disturbed since morning. I cried. Felt grateful for what he has given us. Felt hearbroken for not being able to watch his films in the future.
I didn't realize when I started admiring him unknowingly and when I developed so much respect towards him. How I am posting something like this ?! I am surprised myself. But I think this is the power real actor possesses.
An actor whose art left us spellbound not only while watching his movies but also when he left us for the heavenly abode.
Huge loss of Indian Cinema.
Respect Mr. Irrfan Khan.
May your soul rest in peace.

Friday, April 17, 2020

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 6



काश! 'निसर्ग' ही कोणी एक व्यक्ती असती आणि आपल्याला त्याला follow करता आलं असतं...सोशल मीडियावर. 'Nature_official'....simply wow !

या quarantine period मध्ये केवढं active असतं निसर्गाचं account!
केवढे followers वाढवता आले असते त्याला!
आणि Live गेला असता तर मग संपलंच! वेबसाईट crash च झाली असती बहुतेक !
सतत content creation! जलवा!
पण याला ना कळतंच नाही. स्वतःचा उदोउदो करून घेणं त्याच्या मनातसुद्धा येत नाही!
की याने स्वतःचं talent discover च केलं नाहीये ? Social Influencer आहे अरे हा!! कोणीतरी सांगा याला !
अरे हा किती मागे पडतोय जगाच्या !!??
आपण सगळे आहोत आजुबाजूला. तरी fomo याला शिवतसुद्धा नाही !
किती तो स्थितप्रज्ञ !
आपापलं काम करत असतो उसन्या प्रसिद्धीच्या मार्गी न जाता !
उलट त्याच्याकडे जे काही आहे, ते सढळ हस्ते देत सुटलाय जगाला...without any professional charges!
त्याच्या साधेपणात किती सौंदर्य आहे!
अं...म्हणूनच कदाचित followers वाढवण्यासाठी त्याला agency appoint करावी लागली नसावी. किती contentful yet नि:स्वार्थी !
किती निरपेक्ष आणि सुंदर !
काश! 'निसर्ग' ही कोणी एक व्यक्ती असती आणि आपल्याला त्याला follow करता आलं असतं...खऱ्याखुऱ्या आयुष्यात!

Thursday, April 9, 2020

'उदर'भरण नोहे...

    सध्या लोकांकडे बराच वेळ आहे. त्यामुळे कित्येक लोक स्वयंपाकाशी संबंधित आपल्या सगळ्या हौशीमौजी भागवण्यात गुंतले आहेत. कोणी काही नवीन पदार्थ शिकतंय, तर कोणी ज्यावर हात बसलाय असे पदार्थ आपल्या घरच्यांना करून खाऊ घालतंय. एकंदरीतच काय तर सध्या सोशल मिडियावरच्या पोस्ट आणि स्टोरीज चमचमीत पदार्थांपासून ते dalgona coffee पर्यंत सगळ्या पदार्थांनी भरलेल्या आहेत.

    मित्रांनो, मला लोकांच्या उत्साहाचा पूर्ण आदर आहे. खरं पाहता प्रत्येक जण आपापल्या घरी स्वकष्टांनी सगळं करून खातोय. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार नाही. पण सद्य परिस्थितीत आपण सगळे एकत्र आहोत असं आपण सारखं ऐकतो, वाचतो आणि मानतोही. त्यामुळे याच आपुलकीच्या अधिकाराने एक विचार मनात आला तो शेअर करते.


    मित्रांनो, आपल्याला जी सक्तीची सुट्टी मिळालीये ती मजा करण्यासाठी नव्हे. आपल्या हौसेचा पूर्ण आदर राखत एक विनंती करावीशी वाटते, की सध्या जिभेची ईच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपण कमीत कमी अन्नघटकांमध्ये पोटाची भूक भागवली जाईल, असे पदार्थ करण्याकडे भर देऊया. साग्रसंगीत पिझ्झा, पास्ता, पावभाजी किंवा तत्सम इतर कुठलेही चमचमीत पदार्थ ही आपली सध्याची गरज नसावी. त्यापेक्षा आमटी, पिठलं, भात, खिचडी, पुलाव, पोळ्या, भाकऱ्या, साध्या भाज्या अशा पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे.इतर वेळी अर्धा लिटर दुधामध्ये सगळ्यांचा दोन वेळचा चहा होत असेल तर केवळ पोस्ट टाकण्यासाठी एकाच वेळी अर्धा लिटर दूध संपावणाऱ्या dalgona coffee चा अट्टाहास सध्या नको. कारण जितके जास्त पदार्थ आपण एका वेळी वापरू, तितके लवकर घरातले पदार्थ संपतील आणि तितक्यांदा आपल्याला सारखं बाहेर पडावं लागेल किंवा घरी सामान मागवावं लागेल. यापैकी कुठलाही ऑप्शन हा कोरोनाचा संसर्ग वाढवण्याला हातभार लावू शकतो. इतर वेळी आपण जिभेचे आणि मनाचे लाड पुरवतोच की! त्यामुळे चंगळ थांबवून गरज भागवण्याकडे आत्ता भर दिला पाहिजे आणि घरात आहे ते सामान जास्तीत जास्त दिवस कसं पुरवता येईल याची मॅनेजमेंट आत्तापासून केली पाहिजे. बाजारातल्या गोष्टीसंपून परिस्थिती बिकट होण्याआधीच.

    काही जण म्हणतील की आमच्यासाठी cooking ही पॉझिटिव्हिटी निर्माण करणारी गोष्ट आहे किंवा passion, मेडिटेशन आहे वगैरे. अशा लोकांचाही मनापासून आदर आहे. पण सध्याच्या परिस्थितीत एखाद वेळेला exclusive पदार्थ करून तिथे थांबायचं की रोज स्वतःला कमीत कमी पदार्थांत जास्तीत जास्त चविष्ट अन्न तयार करण्याचं challenge देऊन आनंद साजरा करायचा, हे ज्याचं त्या ने ठरवावं.

    आतापर्यंतची कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता लॉकडाऊन पिरेड हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. असं किती दिवस, आठवडे, महिने सुरू राहील माहिती नाही. असं न होवो अशी मनापासून इच्छा आपण सगळेच करत असलो तरी संकट आलंच तर त्याचा सामना करायची तयारीही एकीकडे करायला हवी आणि जितकी आपली तयारी आपण दाखवू, तितकं संकट कमी होत जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सोसायटीने, नगरसेवकांनी किंवा इतर सामाजिक संस्थांनी काही गरजेच्या वस्तू आणून द्यायची सोय केली तर त्याचा गैरफायदा कोणी घेता काम नये. 'गरज' आणि 'चैन' यातला फरक लक्षात घेऊन वागुया.

    हा विचार मांडत असताना कोणावर टीका करायचा हेतू नाहीये. कारण प्रत्येक घरात केलेली अन्नाची साठवण, माणसांची संख्या आणि त्यानुसार एका वेळच्या अन्नाची लागणारी गरज ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे आपापल्या घरातल्या एकूण परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाने 'गरजेचा' मापदंड ठरवण्याची ही वेळ आहे.

    जर आपण एकीची भावना निर्माण व्हावी म्हणून खिडक्या-दारांमध्ये येऊन थाळीनाद करू शकतो आणि दिवे लावू शकतो, तर त्याच एकीच्या भावनेने आपापल्या स्वयंपाकघरात रोजच्या जेवणाची मॅनेजमेंट करून एकमेकांची मदत आणि सुरक्षा नक्कीच करू शकतो. बघा पटलं तर..