साध्या साध्या गोष्टी एकाच वेळी मनात अनेक विचार पेरून जातात आणि तेव्हा प्रश्न पडतो "काय बाई सांगू ?" काही बहरलेल्या विचारांची हि छोटीशी बाग तुमच्यासमोर आहे...तुमच्या विचारांचं खत घालून माझ्या विचारांना आणखी बहरायला मदत करून ह्या छोट्या बागेचं नंदनवन केलंत तर आनंदच आहे ! :)
Wednesday, November 13, 2019
प्रवास : अमृतसर : गोल्डन टेम्पल
Monday, February 18, 2019
सिनेमा : आनंदी गोपाळ
बरेचदा ऐकलंय, माणसं काही कार्यासाठी जन्म घेतात. कार्य झालं की पुढच्या प्रवासासाठी निघून जातात. काल आनंदी बाईंचं आयुष्य पडद्यावर पाहताना मला पहिल्यांदा या विचाराची प्रचिती आली. अवघ्या २२ वर्षांच्या आयुष्यात लग्न, बाळंतपण आणि डॉक्टरेट? त्यांच्या काच-बांगडी खेळायच्या वयापासूनच आयुष्य किती वेगाने बदलत गेेलं! आपली आपल्यालादेखिल हळुहळू ओळख होत असते. पण एखाद्या भावनेशी मैत्री होईपर्यंत ती नाहीशी होऊन नव्या परिस्थितीशी जुळवाजुळव सुरू!
Monday, November 12, 2018
सिनेमा : '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर'
'...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' सिनेमा पाहिला. सिनेमा किती उत्तम आहे हे मी काही पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सिनेमा बघताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते असं की सोशल मीडिया आणि दूरदर्शनच्या चॅनल्सनी आपण इतके वेढले गेलो आहोत, की त्यामुळे आपल्याकडची कलाकारांविषयीची नाविन्याची भावना थोडी लुप्त झालीये. म्हणजे एखाद्या सुपरस्टारचं आकर्षण कोणाला नसतं, पण चित्रपटाच्या पोस्टरवरचा कलाकार (तेही बहुतेकदा त्या कलाकाराचं पोर्ट्रेट रंगवलेलं, फोटो नव्हेच!) कधीतरीच प्रत्यक्षात बघायला मिळणं, गर्दीतून वाट काढून त्याला सेकंदभरासाठी स्पर्श करता येणं आणि त्यानंतर 'अमुक एका कलाकाराला प्रत्यक्षात बघणाऱ्या काही मोजक्या भाग्यवंतांपैकी आपण एक आहोत' ही निर्माण झालेली कमालीची फिलिंग दुर्दैवाने आमच्या पिढीच्या वाट्याला येणे नाही ! आपण आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, सोशल मीडियावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये सतत पाहत असतो; इतकंच कशाला 'facebook / instagram live' मधून थेट संवादही साधत असतो. त्यामुळे '#fan moment' ही routine चा भाग झालेली असताना आपण डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या आजूबाजूच्या गर्दीइतके भाग्यवंत नाही, असं वाटतं. सोशल मीडिया ही आजची गरज आहे, त्यामुळे त्याला दोष देण्याचा अजिबातच उद्देश नाही, फक्त ती 'नवखेपणाची' मजा मिस करत असल्याचं छोटंसं दुःख आहे! :)
Monday, August 27, 2018
संगीत : ये वो बंधन है जो कभी टूट नही सकता...
आत्ता नाशिक-मुंबई प्रवास करत्ये. गाणी ऐकता ऐकता 'स्वदेस'मधलं 'ये जो देस है तेरा' गाणं लागलं. माझं फार आवडतं गाणं. आजपर्यंत कितीतरी वेळा ऐकलं. पण गाण्याची ही जादू आहे. ज्यावेळी आपण गाणं ऐकतो, त्यावेळच्या मनातल्या भावनांप्रमाणे ते ते गाणं आपण अनुभवतो. आज रक्षाबंधन. माझ्या भावांना भेटले नाही. खूप मिस करत्ये त्यांना. सगळ्यांचे आपापल्या भावांबरोबरचे फोटो पाहून तर ही भावना शतपटीने दुणावली. मनात हे सगळं उपर-निचे घडत असतानाच, 'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, ये जो बंधन है वो कभी टूट नहीं सकता!' हे शब्द ऐकत होते. एक विचार आला मनात. वाटलं, देश आपलं रक्षण करतो, आपण या देशाची काळजी घेतो ? त्याच्यावर प्रेम करतो? किती केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी?
Saturday, August 4, 2018
संगीत : सहेला रे...
लहानपणी शास्त्रीय संगीत शिकत असताना हळुहळू जेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येऊ लागली, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे हे जेव्हा कळू लागलं, तेव्हा एकएका स्वररत्नांची नावं कानावर पडू लागली. त्यातलंच एक नाव गानसरस्वती किशोरीताई आमोणकर. ताईंबद्दल ऐकलं होतं. त्यांचं गाणं अद्वितीय आहे, त्यांनी संगीताबद्दल प्रचंड चिंतन मनन केलं हे सगळं माहिती होत होतं. पण त्यावेळी माझ्या बालबुद्धीकडे त्यांच्या विचारांची व्याप्ती काय असेल याची कल्पना करण्याची शक्ती नव्हती.
Tuesday, July 31, 2018
प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 5
कृतज्ञतेचं ओझं
Thursday, June 21, 2018
प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 4
'शांती'स्तूप
लोकहो, केवळ लडाखलाच नाही, कुठेही गेलात आणि पर्यटक त्या त्या जागेचा रुतबा समजून वागत नसतील, तर आवर्जून त्यांना तसं वागण्यापासून रोखा. लोक निर्लज्ज असतात, "तुम्हे क्या करना है" वगैरे प्रश्नांना कदाचित तुम्हांला सामोरं जावं लागेल, पण शांततेने शक्य होईल तितक्या माणसांना त्या त्या जागेत नियमाने वागण्यास सांगा. तुमचा फिरण्याचा फार वेळ आणि श्रम यात घालवू नका, पण "हमे क्या करना है" म्हणून पुढेही जाऊ नका. आपण इतर वेळी देशासाठी फार काही करू शकत नाही, ही चांगली संधी आहे!